माझ्या वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षीच स्वतःचा व्यवसाय उभारण्याचे स्वप्न मी मनाशी पक्के केले होते. कालांतराने ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिकल, बांधकाम आणि इतर अनेक उद्योगांमध्ये काम करताना मला व्यवसायाच्या विविध पैलूंचा सखोल अनुभव मिळाला. मात्र हा प्रवास सोपा नव्हता. आर्थिक संघर्ष, एकटेपणाचे प्रसंग आणि महत्त्वाचे निर्णय स्वतःच घ्यावे लागणाऱ्या परिस्थितींचा मला सामना करावा लागला. पण या प्रत्येक अनुभवाने मला खचवण्याऐवजी अधिक मजबूत केले. स्वतःवरील विश्वास अधिक दृढ झाला आणि त्यातूनच Ishvanta Global Pvt. Ltd. उभारण्याचा पाया घातला गेला.
उद्यमी महाराष्ट्रशी जोडले जाणे हा माझ्या उद्योजकीय प्रवासातील महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरला. विखुरलेल्या प्रयत्नांऐवजी लक्ष केंद्रित, शिस्तबद्ध आणि परिणामकारक अंमलबजावणीचे महत्त्व मला समजले. डॉ. ओंकार हरी माळी यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवायला शिकले आणि कल्पनांना कृतीत रूपांतरित करण्याची स्पष्ट दिशा मिळाली. आज माझ्या व्यवसायाने ₹१०+ कोटींच्या उलाढालीचा टप्पा गाठला असून भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये मजबूत उपस्थिती निर्माण केली आहे. धैर्य, स्पष्टता आणि सातत्यपूर्ण अंमलबजावणी यांच्या बळावर हा व्यवसाय सातत्याने विस्तारत आहे.